*लीलाच्या हातात जहागीरदारांच्या घराच्या किल्ल्या, काय असेल दुर्गाचा प्रतिक्रिया ?*
*लीलाच्या घर चालवण्याचा अंदाज पाहून एजे होणार प्रभावित !*
*'नवरी मिळे हिटलरला'* मालिकेत लीला आणि रेवतीचा झालेल्या अपघाताने खूप गोष्टींचा उलगडा झाला आहे. लीला ठरवते की यश सापडल्याशिवाय ती घरात परत येणार नाही. एजे आणि लीला एकत्र येऊन यशचा शोध घेतायत, पण आता दुर्गा त्याला विरोध करते. दुर्गा, लीलावर यशच्या आयुष्याशी खेळ केल्याचा आरोप करते. ती ठामपणे सांगते, *"लीला इथे पाहिली तर मी हे घर सोडून जाईन. "* एजे आणि सरोजिनी सोडून सगळेजण दुर्गाच्या बाजूने आहेत. शेवटी, लीला घर सोडून जाते आणि पुन्हा एजे आणि लीलामध्ये दुरावा निर्माण होतो. मात्र, विश्वरूपच्या मदतीने ते दोघं पुन्हा एकत्र येतात. याच दरम्यान किशोर आणि विक्रांत एका योजनेवर काम करतायत ज्यावर त्यांचे मतभेद होतात. एजे, लीलाला त्याच्या रेस्टॉरंट पुन्हा जॉईन करण्याचा सल्ला देतो. लीलाला रेस्टॉरंटमधील घोटाळ्याचा संशय आलाय. प्रमोद आणि विराज हे त्या घोटाळ्याचे मुख्य चेहरे आहेत. पण लीला त्यांना निर्दोष मानते. प्रमोद आणि विराज तिच्या या विश्वासाने प्रभावित होऊन लीलाला पुन्हा घरी आणण्याची मागणी करतात. लीला पुन्हा घरी परातल्याच कळताच, आपलं अस्तित्व घरच्या लोकांना कळावं म्हणून दुर्गा घराबाहेर पडते. सरोजिनी घराच्या किल्ल्या लीलाच्या हातात देते, ज्यामुळे दुर्गाचा जळफळाट होतोय. लीला तिच्या मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे घर चालवते, ज्यामुळे एजे प्रभावित होतो. पण सुना मात्र तिच्यावर चिडल्यात.
आता दुर्गाचा डाव तिच्यावरच भारी पडेल ? या सगळ्यामुळे एजे आणि लीला पुन्हा जवळ येतील ? यासाठी बघायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.